न्यूयॉर्क 2000 “खरा बदल अंतःकरणातच घडायला हवा ” परिवर्तनाच्या मोठ्या आशाआकांक्षा मनी बाळगून आपण नव्या सहस्राब्दात पदार्पण केले आहे. परंतु नुसतेच वर्षदर्शक आकडे बदलले आहेत, मूलभूतपणे काहीच परिवर्तन घडलेले नाही. खराखुरा बदल तर आपल्या अंतःकरणातच घडून यायला हवा. कारण आपल्या अंतःकरणातून संघर्ष व नकारात्मकता काढून टाकली तरच आपण शांतीच्या प्रस्थापनेत खरीखुरी विधायक भूमिका बजावू शकतो. […]